गुन्हेगारी घटनांनी सर्व सामन्य भयभीत – माजीमंत्री छगन भुजबळ
नाशिक : शहर
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. लुटमार, खून, चोरी, मारझोड, फसवणूक आदी सारख्या घटनांनी सर्वसामान्य नागरीकांचे जीवन भयभीत झाले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे .
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आयुक्तांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली . शहरातील गुन्हेगारी थांबवावी अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरतील असा इशारा भुजबळांनी दिला. पोलिसांकडून गुन्ह्याची उकल लवकर होत नसल्याने तोच दुसरा गुन्हा घडत आहे. यामुळे नाशिकचे वातावरण बिघडत चालले असल्याचा आरोप भुजबळांनी लगावला