नाशिक : वार्ताहर
टायगर ग्रुप संघटना ही युवाशक्तीचा स्वच्छ ग्रुप आहे. तरुणाईमध्ये मोठा जोश जल्लोष असतो. न्यायसनावर बसलो तरी मी पलीकडच्या माणसासाठी आहे. मी आपला समाजसेवक म्हणून कार्यक्रमास आलो आहे. वाल्याचा वाल्मिकी होतो , असा आपला इतिहास आहे. गुन्हा चुकून घडला असेल त्या व्यक्तीची पुनर्स्थापना करायची गरज असल्याचे मत सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन गोसावी यांनी दादासाहेब गायकवाड सभागृह येथे रविवारी (दा५) टायगर ग्रुप संघटने च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या संघटनेच्या कार्यक्रमात माध्यमांसमोर व्यक्त केले.
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांनी सांगितले की, नाशिक मध्ये प्रथमच आलो आहे. अखेर पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षा बरोबर टायगर ग्रुप संघटना
जाणार नाही. जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्या माध्यमातुन नाशिक मध्ये युवकांसाठी मोठें सामाजिक काम करनार आहे.भारतभर संघटना मजबूत करायची आहे. राज्यासह
नाशकात रोजगार मेळावा घेऊन युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल . आमचे २ कोटी फॉलोअर्स, २५ लक्ष सदस्य आहे.अखेरपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षा समवेत किंवा कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व सामन्यांची कामे करनार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
नाशिक टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष
प्रशांत काळे यांनी यापुढेही टायगर ग्रुप १०० टक्के सामाजिक कार्य करणार असल्याचे सांगितले. खा. गोडसे यांनीही मोठे सामाजिक काम असल्यामुळे कार्यक्रमाला आलो असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ४ रुग्णवाहिका लोकार्पण, व्हीलचेअर चे वाटप, दीव्यांग बांध वाना स्टिक वाटप आणि ५ आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संघटना करण्यात येईल . प्रशांत काळेच्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आ.देवयानी फरांदे, टायगर सेनेचे शह राध्यक्ष अर्जुन काळे, सुनिल फरांदे, यांच्यासह राज्य भरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.